


गेली आठ दिवस अवकाळी पावसाने थैमान घातले असे आज आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ मंगळवार दिनांक १९ रोजी सायंकाळी सहा, सव्वा सहाच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाळुंगे पडवळ येथील चासकर मळा येथे शेतकरी सुनील बबनराव चासकर यांच्या कांद्याच्या बराखीवर वीज पडून कांद्याची बराखी जळल्याची घटना घडली असून यात बराखी व शेतकऱ्यांचा कांदा जळून मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान घटनास्थळी सरपंच सुजाताई चासकर सचिन भाऊ चासकर यांनी येत स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे मात्र बराखी लाकडाची असल्याने पूर्णपणे जळाली आहे या शेतकऱ्याला शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी सरपंच सुजाताई चासकर यांनी केली आहे. शेतकरी अडचणीत असतानाच पुन्हा निसर्गाने शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान केल्याचे चित्र हे परिसरात पहावयास मिळते आहे.