दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चा सध्या संपूर्ण राज्यभर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलं होतं. जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चर्चा झाली असती, तर मित्र पक्ष म्हणून अजित पवार यांनी भाजपला नक्कीच माहिती दिली असती, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. दरम्यान, पक्षफुटीपूर्वी ज्यांच्यावर सर्वाधिक गुन्हे दाखल होते, तेच राष्ट्रवादीचे काही नेते आज विलिनीकरणाला विरोध करताना दिसत आहेत. यामागे भाजपचा दबाव आहे का? असा सवाल उपस्थित होत असताना ठाकरे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. माध्यमांशी बोलताना राऊत यांनी दावा केला की, प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांचे “दोन्ही पाय भाजपमध्येच आहेत. असे टिकास्त्र सोडले आहे.
शरद पवार गटाच्या नेत्यांनी विलिनीकरणावर चर्चा करण्यापुर्वी अजित पवार गटाचे नेते मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशा आता दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र आले पाहिजेत असे भाषय माध्यमात केलं होतं मात्र त्यानंतर मात्र ते आजपर्यंत माध्यमांसमोर आलेले नाहीत, मात्र त्यानंतर सुनिल तटकरे, छगन भुजबळ आणि प्रफुल पटेल वर्षा बंगल्यावर जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी अजितदादांना विलिनीकरण करायचं होते तर ते प्रथम माझ्याशी बोलले असते असे माध्यमावर सांगून टाकले. त्यानंतर शरद पवार यांनी त्यांचे वक्तव्य खोडून टाकले होते. दरम्यान यावर संजय राऊत यांनी अजित पवारांचा पक्ष देवेंद्र फडणवीस चालवितात का असा सवाल केला आहे.