
रांजणगाव गणपती:-रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या तिहेरी खून प्रकरणाचा पुणे ग्रामीण पोलिसांनी अतिशय कौशल्याने आणि तांत्रिक तपासाद्वारे पर्दाफाश केला असून या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. नुकतेच नियुक्त झालेले पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या नेतृत्वाखाली ही उल्लेखनीय कामगिरी पार पडली.
घटनाक्रमाचा तपशील…
दि. २५ मे २०२५ रोजी रांजणगाव गणपती परिसरात, पुणे-नगर महामार्गालगत बंद असलेल्या ग्रोवेल कंपनीजवळ एका दुर्गम भागात एक महिला व दोन लहान मुलांचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळले होते. या घटनेची रांजणगाव पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आली होती.
तपासात आलेले धागेदोरे…
मृत महिलेच्या हातावरील “जयभीम”, “Rajratan”, “mom dad”, “RS” या टॅटूंवरून ओळख पटविण्याचे प्रयत्न, तब्बल २५० सीसीटीव्ही फुटेज, १६,५०० भाडेकरू, कामगार, बँक खातेदार, आरोग्य विभाग, लसीकरण नोंदी पोलिसांनी तपासल्या कारण घटनास्थळ अत्यंत दुर्गम व पावसामुळे कोणतेही पुरावे सापडले नव्हते.
पोलिस अधिक्षक संदीपसिंह गिल्ल यांची युक्ती…
या गुन्ह्याच्या तपासासाठी पुणे ग्रामीणचे नवनियुक्त पोलिस अधिक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी स्वतः सर्व ३३ पोलिस ठाण्यांमधून एक-एक अंमलदारांची निवड करुन स्थानिक गुन्हे शाखा व शिरुर उपविभागीय पथकाच्या सहकार्याने ६ विशेष तपास पथके तयार केली आणि त्यांना महाराष्ट्रभर मानव मिसिंग नोंदींची चौकशी करण्यासाठी रवाना केले.
गुन्हेगाराचा शोध कसा लागला…?
या तपासादरम्यान बीड जिल्ह्यातील माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात ९ मे रोजी दाखल झालेली एक मिसिंग नोंद तपास पथकाच्या हाती लागली. त्यातील वर्णन व मृतदेहातील वैशिष्ट्ये जुळत असल्याचे निष्पन्न झाले. तपासाअंती मृत महिलेचे नाव स्वाती केशव सोनवणे (२५, रा. वाघोरा, बीड) असे निष्पन्न झाले. तिचे दोन लहान मुलांसह २३ मे रोजी गोरख पोपट बोखारे (३६, सध्या रा. सरदवाडी, शिरूर, मूळ रा. चिखली, श्रीगोंदा, अहमदनगर) या नातेवाईकासोबत आळंदी येथून निघाल्याचे निष्पन्न झाले.
असा झाला खुनाचा उलगडा….
प्रेमसंबंध आणि लग्नाच्या मागणीवरून आरोपी गोरख बोखारे याने स्वाती केशव सोनवणे आणि तिच्या दोन्ही चिमुरड्यांना दुर्गम भागात नेऊन गळा आवळून, डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केली आणि पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी अथक प्रयत्न करत गोरख बोखारे याला अटक करून त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यास ११ जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हे प्रकरण फक्त एक गुन्हा नसून, पोलिस दलाच्या चिकाटी, संघटित तपास प्रणाली आणि तांत्रिक कुशलतेचे उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, शिरुरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, दौंड विभागाचे बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, AHTU पुणे ग्रामीण चे पोलिस निरीक्षक विश्वास जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक निळकंठ तिडके, अविनाश थोरात, महिला पोलिस उपनिरीक्षक सविता काळे, शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे स्थानिक गुन्हे शाखेचे दिपक साबळे, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, अक्षय नवले, संदीप वारे, विक्रम तापकीर, निलेश सुपेकर, राजु मोमीण, अतुल डेरे, सागर धुमाळ, मंगेश थिगळे, बाळासाहेब खडके, रामदास बाबर, हनुमंत पासलकर, हेमंत विरोळे, निलेश शिंदे, अतुल फरांदे, महेश बनकर, विनोद भोकरे, काशिनाथ राजापूरे, रांजणगाव पो स्टे चे गुलाब येळे, दत्तात्रय शिंदे, विलास आंबेकर, विजय सरजिने, उमेश कुतवळ, वैभव मोरे, योगेश गुंड, किशोर शिवणकर, केशव कोरडे, ज्ञानेश्वर शिंदे, शिक्रापूर पो स्टे चे जयराज देवकर, अमोल नलगे, शिरूर पो स्टे कडील विजय शिंदे, निखील रावडे, नितेश थोरात, बीड जिल्हयात गेलेले विशेष तपास पथकातील पोलीस अंमलदार अक्षय यादव, दरशथ बनसोडे, महादेव साळुंखे, गणेश वानकर, सुमीत वाघ यांनी केली आहे.
रांजणगाव येथील तिहेरी खून प्रकरणाचा अवघ्या १२ दिवसांत उलगडा पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी
रांजणगाव गणपती:-रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या तिहेरी खून प्रकरणाचा पुणे ग्रामीण पोलिसांनी अतिशय कौशल्याने आणि तांत्रिक तपासाद्वारे पर्दाफाश केला असून या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. नुकतेच नियुक्त झालेले पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या नेतृत्वाखाली ही उल्लेखनीय कामगिरी पार पडली.
घटनाक्रमाचा तपशील…
दि. २५ मे २०२५ रोजी रांजणगाव गणपती परिसरात, पुणे-नगर महामार्गालगत बंद असलेल्या ग्रोवेल कंपनीजवळ एका दुर्गम भागात एक महिला व दोन लहान मुलांचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळले होते. या घटनेची रांजणगाव पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आली होती.
तपासात आलेले धागेदोरे…
मृत महिलेच्या हातावरील “जयभीम”, “Rajratan”, “mom dad”, “RS” या टॅटूंवरून ओळख पटविण्याचे प्रयत्न, तब्बल २५० सीसीटीव्ही फुटेज, १६,५०० भाडेकरू, कामगार, बँक खातेदार, आरोग्य विभाग, लसीकरण नोंदी पोलिसांनी तपासल्या कारण घटनास्थळ अत्यंत दुर्गम व पावसामुळे कोणतेही पुरावे सापडले नव्हते.
पोलिस अधिक्षक संदीपसिंह गिल्ल यांची युक्ती…
या गुन्ह्याच्या तपासासाठी पुणे ग्रामीणचे नवनियुक्त पोलिस अधिक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी स्वतः सर्व ३३ पोलिस ठाण्यांमधून एक-एक अंमलदारांची निवड करुन स्थानिक गुन्हे शाखा व शिरुर उपविभागीय पथकाच्या सहकार्याने ६ विशेष तपास पथके तयार केली आणि त्यांना महाराष्ट्रभर मानव मिसिंग नोंदींची चौकशी करण्यासाठी रवाना केले.
गुन्हेगाराचा शोध कसा लागला…?
या तपासादरम्यान बीड जिल्ह्यातील माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात ९ मे रोजी दाखल झालेली एक मिसिंग नोंद तपास पथकाच्या हाती लागली. त्यातील वर्णन व मृतदेहातील वैशिष्ट्ये जुळत असल्याचे निष्पन्न झाले. तपासाअंती मृत महिलेचे नाव स्वाती केशव सोनवणे (२५, रा. वाघोरा, बीड) असे निष्पन्न झाले. तिचे दोन लहान मुलांसह २३ मे रोजी गोरख पोपट बोखारे (३६, सध्या रा. सरदवाडी, शिरूर, मूळ रा. चिखली, श्रीगोंदा, अहमदनगर) या नातेवाईकासोबत आळंदी येथून निघाल्याचे निष्पन्न झाले.
असा झाला खुनाचा उलगडा….
प्रेमसंबंध आणि लग्नाच्या मागणीवरून आरोपी गोरख बोखारे याने स्वाती केशव सोनवणे आणि तिच्या दोन्ही चिमुरड्यांना दुर्गम भागात नेऊन गळा आवळून, डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केली आणि पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी अथक प्रयत्न करत गोरख बोखारे याला अटक करून त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यास ११ जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हे प्रकरण फक्त एक गुन्हा नसून, पोलिस दलाच्या चिकाटी, संघटित तपास प्रणाली आणि तांत्रिक कुशलतेचे उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, शिरुरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, दौंड विभागाचे बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, AHTU पुणे ग्रामीण चे पोलिस निरीक्षक विश्वास जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक निळकंठ तिडके, अविनाश थोरात, महिला पोलिस उपनिरीक्षक सविता काळे, शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे स्थानिक गुन्हे शाखेचे दिपक साबळे, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, अक्षय नवले, संदीप वारे, विक्रम तापकीर, निलेश सुपेकर, राजु मोमीण, अतुल डेरे, सागर धुमाळ, मंगेश थिगळे, बाळासाहेब खडके, रामदास बाबर, हनुमंत पासलकर, हेमंत विरोळे, निलेश शिंदे, अतुल फरांदे, महेश बनकर, विनोद भोकरे, काशिनाथ राजापूरे, रांजणगाव पो स्टे चे गुलाब येळे, दत्तात्रय शिंदे, विलास आंबेकर, विजय सरजिने, उमेश कुतवळ, वैभव मोरे, योगेश गुंड, किशोर शिवणकर, केशव कोरडे, ज्ञानेश्वर शिंदे, शिक्रापूर पो स्टे चे जयराज देवकर, अमोल नलगे, शिरूर पो स्टे कडील विजय शिंदे, निखील रावडे, नितेश थोरात, बीड जिल्हयात गेलेले विशेष तपास पथकातील पोलीस अंमलदार अक्षय यादव, दरशथ बनसोडे, महादेव साळुंखे, गणेश वानकर, सुमीत वाघ यांनी केली आहे.