लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे विनम्र अभिवाद

Photo of author

By Sandhya

“साहित्याच्या माध्यमातून जनतेच्या मनात अण्णाभाऊंनी स्थान निर्माण केले” – डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे, १ ऑगस्ट २०२५ : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त स्वारगेट येथील सारसबाग चौकात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित राहून अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन केले आणि पुष्पहार अर्पण केला.

यावेळी सुदर्शनाताई त्रिगुणाईत, संजीवनी विजापुरे, नितीन पवार, संदीप शिंदे (शहर प्रमुख – कामगार), स्त्री आधार केंद्राच्या आश्लेषा खंडागळे, सुरेखा कदम पाटील, रेणुका मादर,श्रद्धा वाडेकर ,मीनल धनवटे ,सोनाली मारणे , सारिका कोकाटे, सुधीर कुरुमकर,नितीन लगस, गडकरी सर, तसेच शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर आधारित विविध पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकांचे उद्घाटन डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते संपन्न झाले. यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव केला.

“संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो वा महिलांच्या व्यथा, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून सामान्य जनतेचे वास्तव आणि भावना प्रखरपणे मांडल्या. त्यांच्या साहित्यामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक जाणीवा जागृत झाल्या. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शिवसेनेच्या वतीने आम्ही त्यांच्या कार्याचा गौरव करत आहोत. अण्णाभाऊंनी जनतेच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे,” असे उद्गार डॉ. गोऱ्हे यांनी काढले.

कार्यक्रमाचे स्वरूप गौरवपूर्ण असून, अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक योगदानाची उजळणी करणारा हा सोहळा उत्सहात पार पडला.

Leave a Comment

You cannot copy content of this page