
विधिमंडळाच्या अधिवेशनात जनतेच्या प्रश्नावर चर्चा अपेक्षित असते पण अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षनेतेपद कोणाला मिळणार ? अशी चर्चा आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीकडून ठाकरे शिवसेना खूप आग्रही आहे. भास्कर जाधव यांचं नाव चर्चेत आहे. मात्र अचानक आज पहिल्याच दिवशी त्या पदासाठी आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे आले.त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले बोलताना ही बाीतमी पेरलेली आहे,अफवा आहे त्यावर कोणीही विश्वास ठेऊ नका. अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले.
महाविकास आघाडीचे एकूण आमदार 46 आहेत. त्यात सर्वाधिक 20 आमदार उद्धव ठाकरे गटाचे आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदाची त्यांची मागणी आहे. मात्र भास्कर जाधव
यांच्या एवजी अचानक आदित्य ठाकरे यांचं नाव चर्चेत आलं. आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपदी नेमण्याची ठाकरे शिवसेनेत चर्चा असल्याची बातमी आली. भेट घेण्याची शक्यता आहे असं बोललं जात होतं.आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते होणार असल्याची बातमी फेटाळून लावली. ‘ही बातमी पेरलेली आहे. अफवा आहेत या, यावर विश्वास ठेऊ नका’ असं ते म्हणाले. उलट आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘एका गटातून 22 आमदार जाणार असं मी ऐकलं आहे’ याला प्रत्युत्तर देताना कुडाळचे शिंदे शिवसेना आमदार निलेश राणे यांनी ते “ज्योतिषी आहेत का ते ? त्यांचे 20 च आमदार राहिले आहेत. नको त्या विषयांमध्ये त्यांनी बोलू नये असं निलेश राणेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं.