The government is committed to securing rights and dignity for women farmers – Sunetra Ajit Pawar.

Photo of author

By Sandhya

महिला शेतकऱ्यांना हक्क व सन्मान मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – सुनेत्रा अजित पवार

यंदाचे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केले असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, महिला शेतकऱ्यांना त्यांचे हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. यासंदर्भातील विधेयक या अधिवेशनात मांडण्यात येणार असून पावसाळी अधिवेशन सकारात्मक वातावरणात पार पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या  की, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित  करण्यात  येत असलेला चहापान कार्यक्रम केवळ औपचारिक कार्यक्रम नसून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील संवादाचे प्रभावी माध्यम आहे. लोकशाहीमध्ये संवादाला महत्व असून संवादातूनच प्रश्न सुटतात, यावर आपला विश्वास आहे. विधिमंडळ हे जनतेच्या अपेक्षा, प्रश्न आणि आकांक्षा मांडण्याचे सर्वोच्च व्यासपीठ असून, अधिवेशनात जनहिताचे विषय, विकासकामे आणि राज्याच्या प्रगतीशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला.



            जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करून मार्ग काढण्याची शासनाची भूमिका असून  राज्याच्या विकासासाठी पावसाळी अधिवेशन मध्ये शेतकरी, कामगार, महिला, युवक, उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांशी संबंधित विषयांवर अधिवेशनात सरकार सकारात्मक भूमिका मांडेल, असेही श्रीमती पवार यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment

You cannot copy content of this page