गेले काही दिवस राज्यात मराठा आरक्षण आंदोलन चर्चेत आहे. मराठा आंदोलनकर्ते सरकारला ४० दिवसांचा कालावधी दिला होता. त्यानंतरही सरकारने मराठा आरक्षणावर कोणतीही ठोस निर्णय घेतला नाही. त्यानंतर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे उपोषणास बसले.
आजचा (दि.३१) उपोषणाचा सातवा दिवस आहे. सत्ताधारी-विरोधकांमध्ये मराठा आरक्षणावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी,”देवेंद्र फडणवीसांना मराठा आंदोलन झेपत नाही, त्यांचा राजीनामा घ्यावा,
असं वक्तव्य केले होते. यालाभाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी प्रतित्यूर दिले आहे. कशाला घसा कोरडा करताय ? चित्रा वाघ यांनी आपल्या ‘X’ खात्यावर सुप्रिया सुळे यांना टॅग करत पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये म्हटलं आहे की,
“ज्यांनी मराठा आरक्षण दिले, त्यांचा राजीनामा कोण मागतय. तर जे 1980 पासून मराठा आरक्षणाचा लढा सुरू झाल्यापासून, मराठा आरक्षणासाठी काहीच करू शकले नाही.
काळजी करू नका मोठ्ठ्याताई सुप्रिया सुळे, आरक्षण हेच सरकार देणार ! जे तुमच्या मनात नाही. जे तुम्ही दिले नाही, त्यावर कशाला घसा कोरडा करताय ?”
काय म्हणाले होत्या सुप्रिया सुळे…
महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. लोकप्रतिनिधींवर हल्ले होत आहेत. त्यांची घरे जाळली जात आहेत. आरक्षणाच्या मागणीचे आंदोलन दिवसेंदिवस दिवस तीव्र होत आहे.
याकाळात राज्याच्या गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रात ठाण मांडून बसणे आवश्यक आहे.परंतु हे महोदय छत्तीसगडमध्ये निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत.
यापुर्वी देखील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला तेंव्हा हे महाशय राज्यात उपलब्ध नव्हते. अगदी नागपूर पाण्यात बुडाले तेंव्हा देखील ते मुंबईत हायकमांडची सेवा करण्यात बिझी होते.
त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा राज्यातील जनतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा उदासीन आणि आकसपूर्ण आहे हे यानिमित्ताने उघड झाले आहे. अडचणीच्या काळात महाराष्ट्रातील जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या या निष्क्रिय गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने त्यांचा राजीनामा घेऊन मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी.