वारूळवाडी येथील महावितरण कंपनीला लागली आग

Photo of author

By Sandhya


वारुळवाडी येथे जुन्या पुणे नाशिक महामार्गावर महावितरण कंपनी उपविभाग नारायणगावमध्ये अचानक दुपारी अंदाजे एकच्या सुमारास कंपनीच्या आतमध्ये असलेल्या वाळलेल्या गवताने अचानक पेट घेतला.हळूहळू वाऱ्याच्या दिशेने व उन्हाच्या तीव्रतेने आग मोठ्या प्रमाणात वाढू लागली.
नारायणगाव पोलीस स्टेशन येथे घटनेची माहिती मिळताच महादेव शेलार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपदा मित्र सुशांत भुजबळ,पोलीस हवालदार मंगेश लोखंडे,ठाणे अंमलदार मोहरे साहेब, तिलेश जाधव साहेब,सोमनाथ डोके साहेब यांनी घटनास्थळी भेट घेतली.
त्या ठिकाणी जाऊन जुन्नर अग्निशामन विभाग जुन्नर यांना फोन करून घटनास्थळी बोलवण्याची तजवीज ठेवली.फायर बंब आग लागल्यानंतर अर्ध्या तासाने तात्काळ हजर झाला.त्यामधील आग वीजवणारे कर्मचारी राजकुमार चव्हाण,संतोष रोकडे यांनी लगेचच घटनास्थळी येऊन त्यांच्या पाण्याने आग आटोक्यात आणली. ही जर आग मोठ्या प्रमाणात लागली असती तर महावितरण कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते.तसेच बाजूला असणारा योगेश बाळासाहेब डेरे यांचा गाईचा गोठा आहे.त्यामध्ये असणाऱ्या दहा दुधाळ गाई आहेत.त्यातील
चार गाईंना आगीची झळई लागून त्यांची त्वचा थोड्याफार प्रमाणात जळाली आहे .
महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता श्री डोंगरे साहेब श्री बांगर साहेब व महावितरण चे वायरमन यांनी सुरुवातीला आग झाडांच्या फांदीने आटोक्यात आणायचा खूप प्रयत्न केला. पण वाढलेल्या गवतामुळे आग नियंत्रणात येत नव्हती.

Leave a Comment