जयंत पाटील : सत्ताधार्‍यांमुळेच पुणे ‘ड्रग्ज-पब्ज’चे माहेरघर….

Photo of author

By Sandhya

जयंत पाटील

‘विद्येचे माहेरघर’ अशी ओळख असलेल्या पुण्याची नवी ओळख ‘ड्रग्ज व पब्जचे माहेरघर’ अशी होत असून, यामागे सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा जबाबदार आहे, असा आराेप शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे.

काय म्हणाले जयंत पाटील?

पोलिसांना गुन्ह्यांची माहिती आता त्यांच्या खबऱ्यांकडून मिळत नसून ती सोशल मीडियावर मिळत आहे. पैशांच्या जोरावर व्यवस्थेला वाकवले जात आहे. मूळ पुण्याची जगभर असलेली ओळख पुसून जाऊन हे शहर आज सत्ताधारी भाजपा शिंदे गटाच्या सरकारमुळे बदनाम होत आहे.

पुणे सत्ताधारी भाजपा शिंदे गटाच्या सरकारमुळे बदनाम जयंत पाटील यांनी एक्स पोस्टच्‍या माध्‍यमातून सत्ताधारी भाजप-शिंदे गटावर निशाणा साधला आहे. त्‍यांनी आपल्‍या X पाेस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, “गेली काही वर्षे पुण्यात गुन्हेगारीने उच्चांक गाठला असून,

देशभर गाजलेल्या ललित पाटील प्रकरणानंतर काल पुण्यात काही अल्पवयीन मुलांचे हॉटेल मध्ये ड्रग्ज सेवन करतानाचे व्हिडियो व्हायरल झाल्यावर पुणे पोलिसांना जाग येऊन पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला.

थोडक्यात काय तर पोलिसांना गुन्ह्यांची माहिती आता त्यांच्या खबऱ्यांकडून मिळत नसून ती सोशल मीडियावर मिळत आहे. अगरवाल पॉर्शे कार अपघात प्रकरणात तर थेट मुलाच्या रक्ताच्या जागी मुलाच्या आईचे रक्त बदलून ठेवण्यात आले. पैशांच्या जोरावर व्यवस्थेला कशाप्रकारे वाकवले जाते, याचे समोर आलेले हे एकमेव उदाहरण आहे.

लोकांच्या नजरेसमोर कधीही आले नाहीत, असे हजारो प्रकार असावेत. ‘विद्येचे माहेरघर’ अशी ओळख असलेल्या पुण्याची ओळख ‘ड्रग्ज व पब्जचे माहेरघर’ अशी होत असून यामागे सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा जबाबदार आहे.

पुणे शहर हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे शहर आहे. मूळ पुण्याची जगभर असलेली ओळख पुसून जाऊन हे शहर आज सत्ताधारी भाजपा शिंदे गटाच्या सरकारमुळे बदनाम होत आहे. ” असेही जयंत पाटील यांनी आपल्‍या पाेस्‍टमध्‍ये नमूद केले आहे.

Leave a Comment