राजकारणावरुन राज आणि उद्धव पुन्हा एकदा आमनेसामने

Photo of author

By Sandhya

राजकारणावरुन राज आणि उद्धव पुन्हा एकदा आमनेसामने

मुंबई – करोनाच्या काळातही अनेकप्रकारचा हलगर्जीपणा झाला आहे. त्यामुळे त्याठिकाणी आजही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करता येऊ शकतो, असे म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावरुन सुरु असलेल्या राजकारणावरुन राज आणि उद्धव पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. विरोधक खारघर घटनेवरुन सरकारला कोंडित पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.

उद्धव ठाकरे यांनी देखील या घटनेवरुन सरकारला लक्ष्य केले आहे. या प्रकरणी समिती वगैरे स्थापन करण्याच्या भानगडीत न पडता सरळ कार्यक्रमाच्या आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

राज ठाकरे यांनी शिष्टमंडळासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राज यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावला.

Leave a Comment