पुरंदर तालुक्यात पावसाचा जोर – नागरिकांनी घ्यावी अतिरिक्त सावधगिरी

Photo of author

By Sandhya

पुरंदर तालुक्यात पावसाने जोर धरला असून नद्यांच्या आणि ओढ्यांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हवामानातील बदल आणि संततधार पावसामुळे परिसरात धोका वाढला असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

विशेषतः दिवे घाट परिसरात डोंगर उतारावर खोदाई सुरू असल्यामुळे दरड कोसळण्याचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे. यामुळे रस्त्याच्या कडेला उभं राहून फोटो किंवा व्हिडीओ काढण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. रस्त्यावर मोठे दगड येण्याची शक्यता लक्षात घेता संबंधित अधिकाऱ्यांना बॅरिकेटिंग करण्याचे आदेश दिले गेले आहेत.

प्रशासनाने सर्व वाहनचालकांना घाटमाथ्यावर वाहनं सावधगिरीने आणि मर्यादित वेगाने चालवण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास स्थानिक कार्यकर्ते आणि प्रशासनिक अधिकारी मदतीस तत्पर आहेत, अशी माहिती स्थानिक प्रतिनिधींनी दिली.

“आपल्या जीवापेक्षा कोणताही आनंद मोठा नाही. कृपया घाटात प्रवास करताना अधिकाधिक सावधगिरी बाळगा आणि गरज भासल्यास संपर्क साधा,” असा संदेशही दिला गेला आहे.

पुन्हा एकदा नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की, आपल्या व आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेस प्राधान्य द्या आणि हवामानाशी संबंधित अधिकृत सूचनांचे पालन करा.

Leave a Comment

You cannot copy content of this page