नाना पटोले : मोदी सरकारला शेतकरीच सत्तेवरून खाली खेचणार…

Photo of author

By Sandhya

नाना पटोले

शेतीमालाला किमान आधारभूत किंमत देण्याचा कायदा करावा, या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी आंदोलन करत आहेत; पण शेतकर्‍यांशी चर्चा करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींना कमीपणा वाटतो.

शेतकर्‍यांवर अत्याचार करणार्‍या भाजप सरकारला शेतकरीच सत्तेतून खाली खेचल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.

आंदोलक शेतकर्‍यांवर गोळ्या झाडण्याची तयारीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली असल्याचा गंभीर आरोप पटोले यांनी केला आहे. ते म्हणाले, गेल्या दहा वर्षांपासून मोदी सरकारकडून शेतकर्‍यांवर अत्याचार केले जात आहेत.

शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या असून, कृषी साहित्यावर 18 टक्के जीएसटी लावून लुटले जात आहे.

Leave a Comment