मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी इकबाल मुसा उर्फ बाबा चौहान हा उत्तर पश्चिम मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार उद्धव ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांच्या प्रचारासाठी फिरताना दिसत आहे, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरेंची मशाल दहशतवाद्यांच्या हाती आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे. उद्धव ठाकरे सरकारमध्ये असताना याकुबच्या कबरीचे सुशोभीकरण करण्यात आले. तसेच टीपू सुलतान आणि औरंगजेबाचा उदो उदो झाला.
आता थेट मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या आरोपीकडून ठाकरे गटाचा प्रचार सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी १९९३ च्या बॉम्ब स्फोटानंतर मुंबईला संरक्षण दिले, पण उद्धव ठाकरे याच स्फोटातील आरोपीची साथ घेत आहेत.
मशाल दहशतवाद्यांच्या हाती देऊन पुन्हा मुंबई आणि देश पेटवायचा मनसुबा उद्धव ठाकरेंचा आहे का? असा सवाल बावनकुळे यांनी केला आहे.