
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या महायुती उमेदवार सुनील कांबळे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत महत्वपूर्ण मुद्दे मांडले. पवन कल्याण यांनी महायुतीला सशक्त सरकार आणि विकासासाठी निवडून देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या 1 ट्रीलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने महायुती सरकारच्या नेतृत्वाखाली काम चालू आहे, आणि यामुळे महाराष्ट्रच नाही तर भारताची अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल.
कांबळे यांच्या नेतृत्वात पुणे कॅन्टोन्मेंट क्षेत्रात झालेल्या विकासाच्या अनेक बाबी त्यांनी नमूद केल्या. घोरपडीच्या रेल्वे फाटकामुळे होणारी वाहतूक कोंडी सोडवली, पाण्याचा प्रश्न सुटला आणि कोरोनाच्या काळात कार्यकर्त्यांनी तासन्तास काम केले, असे पवन कल्याण यांनी सांगितले. “या सर्व विकासाच्या कामांचा विचार करत, येणाऱ्या निवडणुकीत नागरिक निश्चितच काँग्रेस किंवा इतर पक्षांच्या उमेदवारांना नाकारून विकासाला मतदान करतील,” असे सुनील कांबळे यांच्यावर विश्वास व्यक्त केला.
पवन कल्याण यांनी भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्याची आवश्यकता सांगत, मोदी सरकारच्या नेतृत्वात देश आणि धर्माच्या पातळीवर झालेल्या महत्त्वपूर्ण बदलांवर प्रकाश टाकला. त्यांनी सुस्पष्टपणे सांगितले की, “भारत आता महासत्तेच्या मार्गावर आहे, आणि महायुतीला निवडून देणे म्हणजे देशाच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकणे,” असे ते म्हणाले.
यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवी, माजी मंत्री दिलीप कांबळे, तसेच महायुतीचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सी. टी. रवी यांनी भारताच्या संस्कृतीसाठी दिलेल्या बलिदानाचे महत्त्व सांगितले आणि मतदानाच्या माध्यमातून राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.
MLA सुनील कांबळे यांच्या नेतृत्वात कॅन्टोन्मेंट क्षेत्रात झालेल्या सर्वांगीण विकासाचा ठसा नागरिकांवर पडला आहे, आणि येत्या निवडणुकीत त्यांच्या कामांना मोलाची ओळख मिळणार, असे आश्वासन पवन कल्याण यांनी दिले.