देवेंद्र फडणवीस : राहुल गांधींचे हे तर भारत तोडो आंदोलन…

Photo of author

By Sandhya

देवेंद्र फडणवीस

राहुल गांधींच्या महाराष्ट्र जोडोत 100 पैकी जास्त अरकाजतावादी संघटना आहेत. हे भारत जोडो आंदोलन नाही तर भारत तोडो आंदोलन आहे असे म्हणत भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

फडणवीस पुढे म्हणाले की, राहुल गांधी ज्या प्रकारची मोट बांधतायत ती महाराष्ट्रासाठी घातक आहे. तुम्ही संविधनाच्या नावानं लाल पुस्तक का दाखताय? लाल पुस्तकच तुमच्या हातामध्ये का आहे? कुणाला तुम्ही लाल पुस्तकाच्या माध्यमातून इशारा देत आहात, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

भारत जोडोमध्ये दीडशे दोनशे संघटना आहेत, त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर त्या समाजामध्ये द्वेष निर्माण करणाऱ्या संघटना आहेत हे स्पष्ट होतं. हे भारत जोडो आंदोलन नाही नाही. तर भारत तोडो आंदोलन आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

शेतकऱ्यांसाठी 24 तास देण्याचा प्रयत्न – 2014 साली मुख्यमंत्री झालो 2022 मध्ये पाटबंधारे विभाग मिळाला या साडेसात वर्षांमध्ये अनेक कामे केली. तुमच्या पिढीने दुष्काळ पाहिला असेल मात्र आता पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही. जतची दुष्काळी तालुका दुष्काळी गावे ही ओळख आपण कायमची पुसून टाकणार आहोत.

शेतकऱ्यांना 24 तास वीज देता येईल ही तजबीज आम्ही केली आहे. दुष्काळी तालुका, दुष्काळी गाव ही ओळख पुसून टाकणार. युती सरकारच्या काळात 1995 ते 99 योजना सुरु केल्या. त्यानंतर 2014 पर्यंत योजना कुलुपबंद होत्या. त्या मी पुन्हा सुरु केल्या, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

Leave a Comment