
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. माझ्या लाडकी बहिणींचे मनापासून अभिनंदन करतो. आम्ही केलेल्या विकासकामांची जनतेला पोचपावती मिळाली. या विजयामुळे पुढील काळात आमची जबाबदारी वाढली आहे. जनतेला त्रिवार वंदन करतो. महायुतीला आशीर्वाद दिल्याबद्दल जनतेचे आभार मानतो.
समाजातील प्रत्य़ेक घटकाचे अभिनंदन करतो. महायुतीच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. यावेळी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी ‘लाडू’ खाऊन विजयाचा आनंद साजरा केला.
मुख्यमंत्री कोण होणार, यावर अंतिम निकाल येऊ द्या. मग ज्या प्रकारे आपण एकत्र निवडणुका लढवल्या, त्याचप्रमाणे तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी यावेळी दिली.
दरम्यान, निवडणुकीच्या आयोगाच्या आकडेवारीनुसार महायुतीने २१७ जागांवर आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीने ५१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर इतरांनी २० जागांवर आघाडी घेतली आहे. दरम्यान, राज्यात महायुतीने सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे.