शरद पवार : काहीही झाले, तरी घटना बदलू देणार नाही…

Photo of author

By Sandhya

शरद पवार

लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी 400 पारचा नारा दिला होता. खरे तर सत्ता स्थापनेला इतके खासदार लागत नाहीत. त्यामुळे त्यांच्या हेतूविषयी शंका आली. त्यांच्या मनात काहीतरी काळेबेरे असल्याचे जनतेच्या लक्षात आले. 400 जागा जोपर्यंत मिळत नाहीत, तोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना बदलता येणार नाही, अशी माहितीही त्यांच्याच लोकांनी दिली.

याबाबत आम्ही जागृती केली. त्यासाठी ‘इंडिया’ गठबंधनमधून समविचारी पक्ष एकत्र आणल्याने भाजपला दणका बसला. परिणामी, घटनादुरुस्तीचे पाप मोदींना करता आले नाही. व्यासपीठावर महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार पवार म्हणाले, पाच वर्षांपूर्वीची निवडणूक झाली, त्यावेळी राज्यात काँग्रेसला अवघी एक जागा मिळाली. मात्र, यावेळी 48 पैकी 31 जागा जनतेने महाविकास आघाडीला दिल्या. त्यामुळे घटनादुरुस्तीचे पाप मोदींना करता आले नाही. आता चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार यांना सोबत घेऊन सरकार सुरू आहे.

आता सत्ता आल्यावरही महायुती सरकारने काय केले? कोणते निर्णय घेतले? देशातील शेतकरी, तरुण आणि भगिनींची काय अवस्था आहे? एका वर्षात 900 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, त्यांच्या मालाला किंमत नाही. शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे. प्रधानमंत्री आणि त्यांचे सहकारी देशभरात जातात.

मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला कधी हात घालत नाहीत. त्यामुळे आता शेतकऱ्यांनीच आपले प्रश्न सोडविण्यासाठी सत्ता बदल करावा असे अवाहन उपस्थितांना केले. तसेच राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे मुलींवर अत्याचाराची घटना घडली. राज्यात महिलांना, महिलांना संरक्षण देण्याचे सोडून सरकार महिलांसाठी वेगळे कार्यक्रम घेत आहे.

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पैसे देण सुरू केले. लाडक्या बहिणीला पैसे दिले मात्र, त्यांची अवस्था काय आहे. त्यांच्यावरील अत्याचार थांबविण्यासाठी तुम्ही काय केले असा सवाल यावेळी त्यांनी सरकारला केला. तसेच नऊ हजारांहून अधिक मुली गायब झाल्या आहेत. त्यांचा पत्ता लागत नाही.

रोजगाराअभावी तरुणांमध्ये नैराश्य आले आहे. या सर्वांना सरकार जबाबदार असून, जोपर्यंत सत्ता बदलत नाही, तोपर्यंत तुमची या प्रश्नांतून सुटका होऊ शकत नसल्याचे ते म्हणाले. तसेच जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी उद्धव ठाकरे व मी राहुल गांधींसोबत चालण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

Leave a Comment