रामदास आठवले : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार…

Photo of author

By Sandhya

रामदास आठवले

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरक्षणाचे कायम संरक्षण केले असुन गरिबांसाठी 10 टक्के आरक्षण नव्याने लागू केलेले आहे. एससी,एसटी ,ओबीसी यासह कोणत्याही समाज घटकाचे संविधानाने दिलेले आरक्षण कधीही बदलणार नाही असे नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी वांरवार सांगीतले आहे.

तरीही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तेलंगणा मध्ये मोदी आरक्षण हिरावून घेतील असा खोटा आरोप केला आहे. त्यांच्या आरोपची तक्रार निवडणुक आयोगाकडे करणार असल्याचे रिपाइचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी सगीतले आहे. हैदराबाद येथे आयोजित रिपाइंच्या बैठकीत ते बोलत होते.

यांची दखल निवडणुक आयोगाने घ्यावी, ईमेल पाठवून ही तक्रार करणार असल्याचे आठवले यांनी सांगीतले आहे. रिपाइंचे तेलंगणा प्रदेश अध्यक्ष रविकुमार पसुला हे वरंगल या अनुसुचित जातीसाठी राखीव लोकसभा मतदार संघात पक्षाच्या वतीने निवडणुक लढत आहेत. तर तेंलगणात १६ जागांवर भाजपला पक्षाचा पाठींबा आहे.

Leave a Comment