उपमुख्यमंत्री फडणवीस : पनवती कोण हे आता काँग्रेसला कळले असेल

Photo of author

By Sandhya

उपमुख्यमंत्री फडणवीस

तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला जे अभूतपूर्व यश मिळाले ते यश जनतेच्या मोदींवरच्या विश्वासाचे प्रतीक आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

पनवती कोण हे काँग्रेसला कळले असेल, असा टोला त्यांनी राहुल गांधी यांना लगावला. मोदींनी ज्या प्रकारे गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला, सामान्य माणसाच्या मनात हे बिंबवले की सरकार त्यांच्यासाठी काम करते आहे.

त्याचा प्रत्यय लोकांना आल्याने भाजपचा हा अभूतपूर्व विजय साकार झाला, असे फडणवीस म्हणाले. या विजयाचे श्रेय खर्‍या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच आहे.

शिवाय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह जी भाजपची टीम आहे त्या सगळ्यांचे देखील हे श्रेय आहे. या सगळ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो, असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment